उमेदवार निवडताना मतदारांनी कसा विचार करावा ?
Ø
गेली कित्येक वर्षे काही ठरावीक मंडळी राजकारणात आहेत.
राजकारण हाच त्यांचा व्यवसाय बनलेला आहे. तेव्हा नवीन
रक्ताच्या म्हणजे २५ ते ४५ या वयोगटातील उमेदवारांना निवडावे.
Ø
राष्ट्रीय व सामाजिक प्रश्नांचा ज्यांचा अभ्यास आहे व
आपापल्या मतदारसंघात ज्याचे काम आहे, अशा उमेदवारांचा
प्रथम विचार करावा.
Ø
ज्यांच्याकडे राजकीय, सामाजिक शुध्दता
आहे, त्यांना निवडावे. ज्या उमेदवारांमध्ये प्रश्न सोडवण्याची क्षमता आहे. असांना
अग्रक्रम द्यावा. जे विकले जाणार नाहीत व तशी लेखी हमी देतील, त्यांना निवडावे.
Ø
कालबध्द कार्यक्रम राबविला नाही तर आगाऊ राजीनामा देण्यास
तयारी असणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य द्यावे.
Ø
मतदान करताना कोणाला मत द्यावे, या प्रश्नाइतकेच
कोणाला देऊ नये , याच्याही कसोट्या निश्चित करण्यास महत्त्व आहे. एकवेळ फार श्रेष्ठ नसलेला उमेदवार निवडला गेला तर फारसे
बिघडणार नाही, पण समाजविघातक पध्दतीने राजकारण करणाऱ्या व संशयास्पद चारित्र्याच्या व्यक्तींना
धान्यातल्या खड्यासारखे बाजूला काढणे फार महत्वाचे आहे. म्हणून कोणाला निवडू नये, या संदर्भातल्या काही
कसोट्या सुचवित आहे.
Ø
अनेकदा निवडून आलेल्यांना खुशाल पाडा. राजकारणात नवी पिढी येऊ द्या.
Ø
ज्याच्या संपत्तीची मोजदाद करता येणार नाही, अशा भ्रष्ट माजी आमदार, मंत्री, साखर कारखानदार , समाजाला पिळून धनाढया झालेल्यांना, शिक्षण सम्राटांना
पराभूत करा.
Ø
ज्यांना सामाजिक - राजकीय चारित्र्य नाही अशांना मते देऊ
नयेत.
Ø
पैशांपेक्षा व्यक्ती महत्त्वाची मानावी व उत्तम व्यक्तींना
निवडावे.
Ø
राजकारण हेच ज्याचे चरितार्थाचे साधन आहे , त्यांना निवडून
देऊ नये.
Ø
संपत्तीची आकडेवारी देण्यास तयार नसलेल्या उमेदवारांस आपणही
मते देण्यास नकार द्यावा.
Ø
कालबध्द कार्यक्रमांच्या अटींवर आगाऊ राजीनामा देण्यास तयार
नसलेल्या उमेदवारांस पराभूत करावे.
Ø
निवडून आल्यावर नीतिमुल्ये ठोकरून सत्तेसाठी सत्ताधारी पक्षाला
जाऊन मिळणाऱ्या उमेदवाराला जरूर पाडावे. दारू , मटका , जुगार यांवर अवलंबून जीवन जगणान्यांना अवश्य पराभूत करावे .
Ø
कार्यकर्त्यांनी ५ वर्षे नेत्याच्या मागे राहून ज्या
नेत्याने ऐनवेळी टोपी बदलली , त्या नेत्याला अथवा त्याच्या उमेदवाराला
जरूर पाडा.
:- भास्करराव म्हस्के
No comments:
Post a Comment