अनधिकृत बांधकामांवर उपाय
स्ट्रक्चरली साऊंड हे पक्केपणाची खात्री
असलेली अनधिकृत बांधकामे काही दिवस पर्यायी व्यवस्था होईपर्यंत पाडू नयेत .
Ø
सदर स्ट्रक्चरली साऊंड किंवा पक्के बांधकाम हे अनधिकृत
भूखंडावर असतील व ती भूखंडे सरकारी मालकीची असतील तर बाजारभावाने भूखंडाची रक्कम
बिल्डरकडून ५० टक्के व रहिवाशीकडून ५० टक्के
वसूल करावी
Ø
अनधिकृत बांधकाम करण्यास पहिली व्यक्ती दोषी असते ती रचनाकार . नियमात
न बसणारे बांधकाम ज्याअर्थी मंजूर करून घेतले जाते. त्याअर्थी अनधिकृत बांधकामाला
मंजुरी देणारे अधिकारी तितकेच जबाबदार आहेत.
त्यांना तात्काळ निलंबित करण्यात येईल व तसेच बेकायदा बांधकामाचे नकाशे काढणाऱ्या रचनाकाराचे
परवाने तत्काळ रद्द केले जातील , असा कायदा केल्यास तशा प्रकारच्या
बांधकामास सुरुवातच होणार नाही. तसेच सदर बांधकामे वास्तू रचनाकाराशिवाय इतरांनी काढले असल्यास व
त्यास मंजुरी दिली गेल्यास मंजूर करणारे अधिकारी तत्काळ निलंबित किंवा बडतर्फ
करावेत. असा कायदा करणे जरुरीचे आहे . त्याहीपेक्षा अधिक कडक शासन सदर बांधकामे
बेकायदा आहेत हे माहिती असूनही जे बिल्डर बेकायदा बांधकामे करून ग्राहकांना विकतात
व त्यांची फसवणूक करतात , त्यांना झाले पाहिजे.
Ø
बिल्डर व्यवसायाला रजिस्ट्रेशन नसल्यामुळे कोणीही माणूस
बिल्डर होऊ शकतो . त्यासाठी बिल्डर्सचे रजिस्ट्रेशन महत्त्वाचे असून रजिस्ट्रेशन
देताना मी बेकायदा बांधकाम करणार नाही असे प्रतिज्ञापत्रकही घेणे सक्तीचे करावे , तरच या गोष्टीला
आळा बसू शकेल .
Ø
मुंबई , पुणे , ठाणे , कल्याण , डोंबिवली , मुंब्रा , पिंपरी - चिंचवड अशा मोठ्या
महानगरपालिकेमध्ये जागांचा प्रश्न आधिकाधिक बिकट होत चालल्यामुळे अर्बन सेलिंगमधली
जागा यापुढे बिल्डर्सला देऊ नये व महाराष्ट्रातील ग्रामीण भागासकट परप्रांतातील
कोणत्याही वर्गातील लोकांना प्रवेश बंद करावा. तरीही लोकांचे आगमन झाल्यास त्यांना
कोणत्याही मूलभूत सुविधा देऊ नयेत .
Ø
पक्केपणाची खात्री नसलेल्या अनधिकृत इमारती तत्काळ
पाडाव्यात व तेथे कायदेशीर नव्या इमारती बांधाव्यात व तो सगळा खर्च बिल्डरकडून दंड
म्हणून वसूल करावा .
Ø
आकर्षक नमुनेदार टाऊनशीपचा मुंबईबाहेर स्थलांतर पर्याय
रहिवाशांच्या समोर ठेवावा व हा सारा खर्च बिल्डरकडून वसूल करावा . ( ऑनलाईन
बांधकाम परवाने चालू करणे.)
Ø
सिमेंट , स्टील पुरविणाऱ्या दुकानदारांनी बांधकाम
परवानगी दाखवल्याशिवाय सिमेंट सप्लाय देण्यास बंदी करावी . जसे औषध दुकानदार
डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय औषधच देत नाही , असे जर दुकानदाराने नियम पाळले नाहीतर त्यावर
फौजदारी गुन्हा दाखल करावा .
Ø
ग्रामपंचायतपासून ते
कॉपरिशनपर्यंत व ह्द्द्ती येणारी गावे
फ्रिज एरिया , मेट्रोपोलीटन या सर्व ठिकाणी
बांधकाम नियमावली एकच ठेवणे . फक्त प्लॉट साईज, FSI .ऑमिनीटीझ , रस्ते, कमी - जास्त
सगळीकडे प्रमाण ठरवून द्यावे.
Ø
बेकायदा इमारतीमधील रहिवाशांना रेशनिंग कार्ड , गॅस कनेक्शन , वीज कनेक्शन , ड्रेनेज कनेक्शन , टेलिफोन कनेक्शन , पाणी कनेक्शन
मुळात देऊ नये व दिले असल्यास तत्काळ तोडावेत .
Ø
बेकायदा इमारतीमधील राहणाऱ्यांचे मतदार यादीत नावे घेऊ नयेत . त्यांचा मतदानाचा हक्क रद्द
करावा . त्यांना आधारकार्ड , पासपोर्ट , ड्रायव्हिंग
लायसन्स इ. अशा बेकायदा इमारतीत राहणाऱ्यांना
देऊ नयेत. त्यांना कोणत्याही सरकारी योजनांचा लाभ देऊ नये. अशांची बँकांनी
खाते उघडू नयेत. त्यांना कोणतेही कर्ज देऊ नये.
Ø
झोपडपट्टीवासीयांसारखी बेकायदा इमारतीत राहणाऱ्यांची संघटना
होणे शक्य आहे व अशा संघटनांनी पर्याय द्या म्हटल्यास सरकारने ट्रान्सिट छावण्या
देण्याची तयारी केली पाहिजे.
Ø
विकसित,फुल्लीडेव्हलप,गुंठेवारी,प्लॉट,फ्रीजएरिया,किंवा मेट्रोएरियात टी.पी. नियमाप्रमाणे
मंजूर करावेत.
Ø शहराची अमर्यादित वाढ थांबवण्यासाठी उद्योग - धंदे व सरकारी
कार्यालये , व्यापार , शैक्षणिक संस्था ग्रामीण भागात हलवाव्यात.
म्हणजे नोकरीसाठी शहरात येणारा लोंढा थांबेल. त्यामुळे घरांची मागणी कमी होईल व
बेकायदा बांधकाम घटेल .
Ø
बांधकाम व्यावसाईक लेबर कॅप कंपलसरी
करावेत , मजुरांची सोय
करण्यास सांगावे.
Ø
अपुऱ्या मूलभूत सुविधांच्या कारणास्तव महाराष्ट्र सरकारने
परकीयांना शहरात येण्यास परवानगी देऊ नये. विशेषतः पुणे , मुंबई , ठाणे , नागपूर या
शहरांसाठी हे आवश्यक आहे.
Ø
बेकायदा कामास प्रत्यक्ष - अप्रत्यक्ष मदत केलेल्या
लोकप्रतिनिधींचे सभासदत्व तत्काळ
निलंबित करणे , त्यामध्ये गामपंचायत सभासद, खासदार , मंत्री सर्व आले
पाहिजेत . टी.पी. स्कीम ग्रामपंचायतीमध्ये किंन एरिया , मेट्रोपॉलिटीन
लागू आहेच. मात्र परवानग्या टी.पी. स्कीमप्रमाणे • ग्रामपंचायतीकडे
द्या . तसेच बांधकामाचे बेकायदा इन्स्पेक्शन चालू असल्यास बंद करण्याचे अधिकार
ग्रामपंचायतींना द्या .
Ø बहुसंख्य बेकायदा बांधकामात राहणारे लोक हे बांधकाम मजूर , कामगार , खासगी , सरकारी , कनिष्ठ
चतुर्थश्रेणी वर्ग किंवा कनिष्ठ मध्यमवर्गच असतात . पुष्कळ वेळा परगावातून आलेले
छोटे व्यावसायिकही त्यात असतात , अशा लोकांच्या राहण्याची व्यवस्था शक्यतो
बिल्डर , उद्योगपती , खासगी व्यापारी
यांनीच नोकरी देताना करावी किंवा हमी द्यावी . म्हणजे अशा बेकायदा वस्त्यांना
प्रोत्साहन मिळणार नाही .
Ø
अशी बेकायदा बांधकामे रेग्युलराईज करताना टी . पी .
स्कीममधील आराखड्यास बाधा येत नसेल व वाहतुकीस अडचण येत नसेल व इतरांची हरकत नसेल
तरच जाहीर नोटीस देऊन त्यांच्या पक्केपणाची खातरजमा तज्ञांकडून तपासून मगच
दंडात्मक कारवाई करून रेग्युलराईज करावी .
Ø बेकायदा बांधकाम ज्यांच्या जमिनीवर होते ते जमीन मालक ,डेव्हलपर , बिल्डर , कॉन्ट्रॅक्टर , ऑक्युपेन्ट , सप्लायर , आर्किटेक्ट , स्ट्रक्चरल
इंजिनियर यापैकी कोणालाही सदर बेकायदा बांधकामाबाबत कोर्टात जाण्यास कायद्याने
परवानगी नसावी.
Ø बिल्डर होण्यासाठी किमान पात्रता , अनुभव , शिक्षण , अर्थव्यवस्था इ. चे निकष ठरवणे व
तसा कायदा करण्याची आवश्यकता आहे .
Ø
झोपडपट्टीवासीयांच्या नियमितीकरणांमुळे अशा विनापरवाना
घरांमध्ये राहणाऱ्या लोकांचीही लवकरच संघटना निर्माण होईल व ती मोर्चा , निदर्शने करून
स्थानिक बेकायदेशीर कामाला प्रोत्साहन देणाऱ्या राजकीय पुढार्यांचे नेतृत्व वापरून
सरकारवर पेचप्रसंग निर्माण करतील. त्यासाठी सरकारने बेकायदेशीर बांधकामे ट्रान्सिट
कॅम्प म्हणून वापरावीत.
Ø
बिल्डर्स , डेव्हलपर्स यांचे नोंदणीकरण आवश्यक जसे
कॉन्ट्रैक्टर , व्यवसायाचे नोंदणीकरण केले जाते व त्यांना विविध दर्जा
गुणवत्तेप्रमाणे , अनुभवाप्रमाणे , उपलब्ध मनुष्यबळाप्रमाणे उपलब्ध यंत्रसामुग्रीप्रमाणे
दिला जातो . त्याचप्रमाणे बिल्डर्सचा व्यवसाय करणाऱ्या किंवा डेव्हलपर्सचा व्यवसाय
करणाऱ्या संस्थांची किंवा व्यक्तीची नोंदणी करणे अत्यावश्यक झाले आहे . कारण , कोणताही अनुभव
नसला , कसलेही आर्थिक
पाठबळ नसले , कुठलेही मनुष्यबळ उपलब्ध नसले, कोणतीही
यंत्रसामुग्री उपलब्ध नसली तरी नाममात्र रकमेला जमिनीचे साठेखत करून समाजातील
कोणत्याही स्तरातील व्यक्ती हल्ली बिल्डर होऊ लागली आहे . यासाठी बिल्डर्स
मंडळींची नोंदणी करणे अत्यावश्यक झाले आहे . सदर नोंदणी करताना प्रतिज्ञापत्र
घेण्याची गरज आहे.
सदर प्रतिज्ञापत्रामध्ये मी अनधिकृत बांधकाम करणार नाही. कॉर्पोरेशन , सरकार , ग्रामपंचायत , नगरपालिका , टॉऊन प्लॉनिंग
महामार्ग इ . सर्वांच्या नियमाचे पालन करीन असे नमूद केलेले असावे तसेच सदर
योजनेचे नकाशे , माझ्या कामाचे नकाशे स्ट्रक्चरल ड्रॉईंग इ. कामे नोंदणीकृत
अशा तंत्रज्ञाकडून करून घेईन . पूर्णत्वाचा दाखला घेतल्याशिवाय गाळेधारकास गाळे
हस्तांतरित करणार नाही व मूलभूत सुविधांची संपूर्ण जबाबदारी घेईन , अशा प्रकारचे
प्रतिज्ञापत्र घेऊन मगच बिल्डर्स अथवा डेव्हलपर्स यास व्यवसाय करण्याची परवानगी
द्यावी .
Ø
अनधिकृत झालेल्या बांधकामाच्या क्षेत्रफळानुसार सध्याची
किंमत काढून ती दंड म्हणून वसूल करण्यास सरकारला आदेश द्यावेत. म्हणजे सदर
अनधिकृत बांधकामात राहाणाऱ्या लोकांच्या पर्यायी घरासाठी पैसा उपलब्ध होईल .
Ø
केवळ बांधकाम परवाने हे किचकट करून ठेवल्यामुळे व
भ्रष्ट्राचाराचे कुरण झाल्यामुळे बांधकाम परवानगी प्रक्रिया क्लिष्ट व खर्चिक झाली
आहे . त्यामुळेच अनधिकृत बांधकामे फोफावली आहेत. म्हणून यापुढील बांधकाम परवाने
ऑनलाईन करावेत असे आदेश कोर्टाने द्यावेत.
Ø
मुंबई , ठाणे , कल्याण , डोंबिवली , नवी - मुंबई , पुणे , नागपूर , नाशिक या महानगरामध्ये प्रचंड अनधिकृत
बांधकामे झालेली आहे व सरकारची ती मोठी डोकेदुखी आहे . यासाठी सरकारने अनधिकृत
गाळेधारकांविरुध्द केलेल्या अनेक न्यायालयीन कारवाया व्यर्थ गेलेल्या आहेत, कारण अनधिकृत गाळे
धारकांना पर्यायी राहण्याची व्यवस्था नसल्यामुळे व बिल्डर्सने , आर्किटेक्टने आणि
महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी संगनमत करून चटईक्षेत्र वाढवून घेऊन प्रचंड
बांधकामे केलेली आहेत व त्यातील अनधिकृत गाळेधारकांची संख्या एवढी मोठी आहे की , काही कारवाई
करावयाची झाल्यास प्रचंड गदारोळ उडेल व सामाजिक असुरक्षितता निर्माण होईल , म्हणून सरकारने
अशा अनधिकृत बांधकामावर तेथे चाललेल्या बाजार भावाच्या दामदप्पट रकम वसूल करून .
सदर कामे अधिकृत करावीत म्हणजे सरकारकडे भरपूर निधी उपलब्ध होईल व सरकारवर असलेला
कर्जाचा बोजाही कमी होईल . मुंबई , पुणे विशेषतः मुंबईमध्ये सुमारे १५०००
इमारती केव्हाही कोसळतील , अशा अवस्थेमध्ये आहेत व अनधिकृत
बांधकामावर केव्हाही हातोडा पडेल,अशी अवस्था आहे. त्यामुळे बेघर
होणाऱ्यांसाठी Transit Camp म्हणून बिल्डरकडील मोकळे प्लॉट सरकारला भाडे तत्वावर घेता
येतील किंवा स्थलांतर प्रक्रियेमधील बेघरांना भाड्याने देता येतील .
-भास्करराव म्हस्के
No comments:
Post a Comment