टेकडी धरणे योजना
कायमचा दुष्काळ हटवण्यासाठी अपूर्ण धरणे पूर्ण करूनही पाण्याची गरज भागणार नाही म्हणून पावसाचे
पाणी अडवण्यासाठी प्रचंड महाकाय पाणी साठे (पाणी गोदामे) निर्माण करावी लागणार
आहेत. विशेषत : बाप्पीभवन व पाणी झिरपून जाणारे सुमारे ७० टक्के पाणी
वाचवण्यासाठी टेकडी धरणे ही एक अभिनव योजना जी मी महाराष्ट्र सरकारला सुचवली.
त्याचे ठोस फायदे असे –
१ . कमी खर्च
२ . कमी वेळेत
उभारणी
३ . बाष्पीभवन व
झिरपून जाणारे ७० टक्के पाण्याची बचत
४ . सोईस्कर
विद्युत निर्मिती
५ . कोरडवाहू
शेतीचा आणि पाण्याचा प्रश्न
६ . कोकणातील
पाण्याचा प्रश्न निकाली निघेल
७ . महाराष्ट्र
दुष्काळमुक्त होईल,
सोबतच्या कल्पना
चित्रात दाखवल्याप्रमाणे टेकडी धरणे हा महाराष्ट्राला पाणी प्रश्नासाठी चांगला पर्याय
होऊ शकता , याची शाखशुध्द मांडणी खालीलप्रमाणे आहे.
कोणत्याही गावामध्ये , शहरामध्ये असलेल्या टेकड्यांचा उपयोग सदा पाणी साठा निर्माण करण्याकरता होणे
शक्य आहे आणि अर्थातच त्या पाण्याचा उपयोग पिण्यासाठी , शेतीसाठी , विद्युत निर्मिती , जंगल वाढवणे, पर्यावरण संतुलन या अनेक बाबी साध्य होण्यासाठी
आहेत. तसेच टेकडीवरील एकण ( कंशब्यांड एरिया ) पाणलोट क्षेत्राची मोजणी करून
तेथील सरासरी पावसाचा अंदाज घेऊन एकूण साठ्याच्या पाण्याचे गणित मांडता येणे शक्य
आहे. त्या गणितानुसार टेकडीच्या पायथ्याशी भूमिगत पाणी साठे निर्माण करून, भुमिगत धरणावर व त्यावरील अडलेल्या पाणी साठ्यावर सोलर पॅनल बसवून
विद्युतनिर्मीती शक्य आहे व त्याच विद्युत निर्मितीमधून पाणी पम्पिंग करून पुन्हा
टेकडीवर जंगल वाढवणे , पिण्यासाठी टाक्या भरणे व शेतीसाठी पाणीपुरवठा
करणे शक्य आहे. देशापेक्षाही कोकणात पाऊस जास्त असल्यामुळे तेथे ही धरणे अधिक
फायदेशीर व उपयुक्त ठरतील तसेच महाराष्ट्रात सर्व भागांमध्ये प्रचंड प्रमाणात
टेकड्या असल्यामुळे पाणलोट क्षेत्र भरपूर आहे व पाऊस कमी पडला तरीही तेथे ही योजना केली तर महाराष्ट्राला खूप फायदेशीर ठरेल व पाणी प्रश्न मार्गी लागेल
असे माझे स्थापत्य अभियंता व पाणी प्रशिक्षक म्हणून ठाम मत आहे .
सध्या
चालू असलेल्या पाटबंधारे योजना प्रचंड खर्चाच्या व वेळखाऊ भ्रष्ट्राचाराला कुरण
ठरलेल्या आहेत. त्याबरोबर तत्काळ उपयोगात येणाऱ्या या टेकडी धरणांचा विचार
महाराष्ट्राने केल्यास सिमेंटच्या साखळी बंधाऱ्यासारखी क्रांती महाराष्ट्रामध्ये
होईल . यामुळे पुनर्वसनाचा प्रश्न येणार नाही , पर्यावरणाचे संतुलन राखले
जाईल , कोरडवाह शेतीचा प्रश्न सुटेल. विद्युत निर्मिती , रोजगार निर्मिती , कारखानदारी वाढेल , पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटेल व ग्रामीण भागाचा कायापालट होईल.
:- भास्करराव म्हस्के
No comments:
Post a Comment