Monday, March 16, 2020

Marathi Man # Money #Business # Economics



मराठी माणसाची अर्थकारणात पिछेहाट कशी थांबेल ?


  स्वातंत्र्यानंतरची सुमारे ४८ वर्षे बारकाईने अभ्यासली तर मराठी माणूस अर्थकारणात मागेमागे चालला आहे. आज महाराष्ट्रातील सर्व आर्थिक नाडया बिगर महाराष्ट्रीयन माणसांच्या  ज्यांनी गेल्या ५० वर्षात महाराष्ट्रात येऊन धंदा केला त्यांच्या हातात आहेत. मराठी माणसे व्यापार करू शकत नाहीत. त्यांच्यातला थोडक्यात समाधान वाटणे हा स्वभाव काढून टाकणे आवश्यक आहे. मराठी माणसांना असलेला अहंगंडभांडणेएकमेकांचे पाय ओढणे कोर्टकचे भाऊबंदकी  मोडेन पण वाकणार नाही हा बाणा नुकसानीचा ठरला आहे. त्याने कामाप्रमाणे स्वतःबदल करणे आवश्यक आहे. मराठी माणसे नोकऱ्या शोधत हिंडतात व्यापारात लक्ष पालत नाहीत. भांडवल नाही म्हणून गप्प बसतात. जर ही वृत्ती मराठी तरुणाने टाकली नाहीतर तो कायम कोणाचा तरी गुलामच रहाणार.
 राज्यकत्यांनी अर्थकारणात बिगर मराठी माणसाशीच व्यवहार केले. मराठी माणसांना विश्वासात घेऊन कधीही व्यापार केला नाही. कारणत्यांना बोटायचे की प्राचाराचा बोभाटा मराठी माणसात झाला तर पुन्हा राजकारणात अवघड होईल. परप्रांतीय अमराठी माणूस भ्रष्टाचारासाठी त्यांना अधिक सोईचा व संरक्षित वाटत होता. म्हणूनच महाराष्ट्राच्या स्थापनेपासून सत्तेशी जवजीक असणारे बिगर महाराष्ट्रीयन आज एवढे मोठे झाले आहेतकी ती एक सत्ताच होऊन बसली आहे.

सहकारी क्षेत्रात साखर कारखान्यांमुळे क्रांती झालीआर्थिक नाड्या थोड्याफार हातात आल्यापण तरीही साखरसम्राटांनी व्यापारासाठी मराठी माणसे जवळ केली नाहीत. कारखान्यांचे सल्लागार कंत्राटदार वाहतूकदार,  लिलाव घेणारे सर्व - बिगर महाराष्ट्रीयन निवडले. दरवर्षीच्या कोट्यवधी   रुपयांच्या खरेदीतील कमिशन साठून साखर सम्राट गबर झाले पण त्यांना सप्लाय करणारे व्यापारी त्याहून जास्त गबर झाले. वास्तविक कारखान्यातील सभासदांची मुले शहरात नोकरी शोधायला हिंडत असताना अशा मुलांना जवळ करून भांडवल पुरवून साखर कारखानदारांनी व्यापारी शिक्षण देणे आवश्यक होते. शेवटी सर्व व्यापारी-सप्लायर कॉन्ट्रैक्टर्स कारखान्यामधून अँडव्हान्स घेऊनच मोठे झालेत.
      त्याचबरोबर पैशांची गंगोत्री होती तेव्हा इतर उद्योगात साखर कारखानदारांनी वळणे आवश्यक होते. त्याच काळात स्कूटर मोटारसायकल रेडिओ टीव्ही पाईप्स ट्रॅक्टर औषधे असे अनेक उद्योग महाराष्ट्रात उद्याला आले आणि ते बहुतांशी बिगर महाराष्ट्रीयन लोकांचे होते.गरज ओळखून महाराष्ट्रात बिगर मराठी माणसांनी कारखानदारीतव्यापारात पाय रोवले आणि भक्कम केले.
     मराठी माणूस कायम भांडवल नाही म्हणून सतत तक्रार करतो आणि स्तब्ध बसतो किंवा नोकरी पसंत करतो. ही गोष्ट जरी खरी असली तरी चातुवापासून व्यापार हा वैश्याकडे गेला आहे. त्यामुळे कोठेही गेलात तर व्यापारी हा वैश्य वर्णाचाच आहे. खेडेगावातील वाणी हा तिथल्या पाटलापेक्षा श्रीमंत असतो किंवा पैसेवाला असतो. याचे कारण आपण व्यापाराकडे कधी नीट पाहिले नाही. तो आपला प्रांत नाही आपल्याला व्यापार करताच येत नाही अशीच भूमिका मनात ठेवून मराठी माणसे येत्या ३५ वर्षात अर्थकारणापासून दर फेकली गेली.
                          मराठी माणसाला नोकरीत धन्यता वाटते. याचे प्रमुख कारण शाश्वत  उत्पन्न डोक्याला ताप नको ही वृत्ती बहुतांश मराठी माणसे नोकरीच्याच शोधात असतात.राज्यकर्त्यांना विचारानोकरीसाठी किती मराठी मुले येतात  व किती बिगर मराठी मुले येतात. तर ९० - ९५ टक्के मराठी मुले नोकरीसाठी धडपडत असतात. व्यापाराचा विचारही त्यांच्या डोक्यात येत नाही.

    वास्तविक शेतमालाला दिवसेंदिवस चांगली मागणी येत असताना खेड्यातील मुले नोकरीच्या शोधात असतात. विक्रेता होण्याची त्यांना ताज वाटते. शहरामध्ये ताजा व दर्जेदार शेतीमाल पॅकिंग करून विकता तर भरपूर    पैसे मिळतात. पण चिकाटीने विक्रेता म्हणून व्यवसाय करणे भावात नाही. मोठमोठे व्यापारी - कारखानदार हे पक्षी होते आणि मग कारखानदार झाले.
           विक्रेता होण्याची धडपड मराठी माणसांनी कधीच व्यवसायातील चिकाटी मराठी माणसाना कधीही जमणार नाही. समजूत केली. स्वभाव बदलता येतो इच्छा फक्त हवी.मोडेन परंतु वाकणार नाही हा बाणा मराठी माणसाने बदलला . बाणाप्रमाणे ताठ तरीही धनुष्याप्रमाणे लवचीक होणे मराठी माण आवश्यक आहे. या स्वभावापायी मराठी माणूस व्यापारात खूप नका करून घेतो. बिगर महाराष्ट्रीय कायम लीन असतातव्यापारात वाकेन पण आर्थिकदृष्ट्या मोडणार नाहीही वृत्ती मराठी माणसाला जोपासावी लागेल.
                        महाराष्ट्रातील सर्व कोर्टात भांडणे चालू आहेत ती बहुतांशी महाराष्ट्रीय किंवा मराठी माणसांचीच आहेत. व्यापारी किंवा बिगर महाराष्ट्रीयन शक्यतो कोर्टाची पायरी चढत नाहीत. एकमेकांत समंजसपणे व्यवहार मिटवतात. व्यापाराचा वेळ कोर्टात वाया घालवित नाहीत.

         मराठी माणूस शक्यतो एकमेकांत स्पर्धा करत असतो. दुसऱ्याचे पाय ओढणे आणि त्याला पुढे न जाऊ देणे ही वृत्ती बदलली नाही तर भविष्यकाळ चांगला नाही. इतर बिगर मराठी माणसे एकमेकांना मदत करीत असतात. तोराला देईल पण तुला देणार नाहीही आपली वृत्ती आहे. ती बदलावी लागेलआपल्यातला माणूस मोठा केला पाहिजे. त्याबद्दल मनात आकस आएता कामा नये.
         महाराष्ट्रात गेल्या १५ वर्षांत छोट्यामोठ्या कारखानदारीत मराठी माणसे मागे का पडली याचा विचार केला तर मार्केटिंग नाही एवढे एकच कारण सबळ आहे. तसेच दर्जा नियंत्रण नाही.
         मराठी माणसे गप्पांत फार वेळ घालवितात. म्हणतात ना वादे वादे भवती बुध्दी भेदः पण त्या नुसत्याच गप्पा होतात. त्यातून निष्पन्न काहीच होत नाही. गावोगावी जशी चावडी असतेतसे शहरातही ठरावीक गप्पांचे अड्डे असतातआणि तेथे मराठी खूप वेळ देतो.
               राज्यकर्ताण्यानीही मराठी माणसांना सत्तेसाठी एकमेकांत झुंजवत ठेवले. राज्य करणातच अर्थकारण आहे या वस्तुस्थितीसाठी मराठी माणसे एकमेकांत लढत राहिली.
                        राज्यकर्ते आणि शासनातील नोकरवर्ग हे दोघेही मराठी असले तरी माणसांची कधीच कामे लवकर होणार नाहीत. राज्यकत्यांचा राजकीय स्वार्थ असल्याशिवाय त्यांची कामे झालीच नाहीत. परप्रांतसीद करून पटापट झाली. मराठी माणसाबरोबर राज्यकत्याना कपाता गोवा राज्यकत्यांनी कधीही सादेबाजी केली नाही. शासनातील नोकरवर्गांनी मराठी माणसाला व्यवसायात कधीही वर येऊ दिले नाही. नेहमी परप्रांतीयांनाच मदत केली आणि तीही भ्रष्टाचाराच्या माध्यमातून. मराठी माणसाला झगडावेच लागले.
           मराठी माणसे कायम अरे - तुरे च्या हमरी तुमरीच्या भाषेत वागतात. बिगर मराठी माणसे आर्जवाने काम करून घेतात. तो आर्जव आपण यापुढे शिकलो नाही तर साराच व्यापार मराठी माणसाकडून निघून जाईल. आपण जी व्यापारपेठ पाहतो त्यात मराठी माणसांच्या दुकानात जायला मराठी माणूसच सहसा तयार होत नाही.
           खोट्या प्रतिष्ठेपायी मराठी माणूस धंद्यातील भांडवल खातो. कर्जबजारी होतो. व्यवसातील नफ्यातला काही भागच आपला आहे बाकी धंद्याच्या वाढीसाठी आहे हे सूत्र पाळत नाही. सणवार लमवार लग्नकार्ये इत्यादीत वाट्टेल तो खर्च होऊन जाऊ द्यातपुढचे पुढे. हे धोरण ठेवून साऱ्या व्यवसायाचा नाश करतो. प्रत्येक गोष्टीचे नियोजन करावे लागते हे मराठी माणसाला जमत नाही आणि त्यासारखे वागणेही जमत नाही. त्यासाठी एकमेकांतील खोट्या प्रतिष्ठेची चढाओढ थांबविणे मराठी माणसाने शिकले पाहिजे.
           वास्तविक मराठी माणूस जगात सर्वात बुध्दिमानअनेक तरुण हुशार मुले अमेरिकेत मोठ्या पदांवर आहेत. भारतातील मोठमोठ्या कंपन्यांमध्येही मोठ्या पदांवर महाराष्ट्रीयन माणसे आहेत. मात्र बुध्दी अनुभव माहिती ज्ञान यांची एनकॅशमेन्ट मराठी माणसाला कधीही करता आली नाही. त्यांच्याच माध्यमातून बिगर मराठी माणसे मोठी झाली. याचाही मराठी माणसांनी जरूर विचार करावा.
मराठी माणसांनी चालवलेल्या संस्था मोठ्या होऊ शकल्या नाहीत. मोठ्या झाल्या तरी त्यांची वाढ होऊ शकली नाही. त्याचे कारण म्हणजे माणसांनी मोठे होण्याचा प्रयत्न केला. संस्था मोठी होऊ दिली नाही. सस्था मोठी झाली की माणसे आपोआप मोठी होतातहे सूत्र मराठी माणूस विसरला. संस्थाच खाण्याचा प्रयत्नही अनेक माणसे करतात.
           तुझं आहे तुजपाशी नाटकात जसे लिहीले आहे की उंट तिरकाच चालतोहत्ती सरळ चालतोघोडा अडीच घरे चालतो. तसा मराठी माणसासाठी असलेला ठराविक चक्रमपणा तो भूषणावह समजतो. आपल हे असं आहे बुवा मला तुम्ही बदला मी आपली चाल काहीही झाले तरी बदलणार नाही. ही वृत्ती मराठी माणसाने सोडून समन्वयसामंजस्य हे गुण घेतले नाहीत तर मराठी माणसे महाराष्ट्रातून फार लवकर संपून जातील.

             शेतकऱ्यांच्या सर्व सभेत मी सांगत आलो आहेकी शेती करतो तो शेतकरी शेतीवर जगतो तो शेतकरी ही व्याख्या केली नाही तर शेतीधंद्यातील आकर्षणामुळे सर्व धनदांडगे शेतीतही येतीलयेत आहेतच. मग हळूहळू मराठी माणसाकडे असलेला एकमेव शेती व्यवसाय हाही बिगर मराठी माणसांकडे जाईल व शेतकऱ्यांना स्वतःच्याच शेतावर शेतमजूर म्हणून वागावे लागेल.
             महाराष्ट्रातील आर्थिक नाड्या ह्या बहुतांशी बिगर मराठी माणसाच्या ताब्यात आहेत. त्यामुळे राज्यकर्तेही त्यांच्याच अधिपत्याखाली व्यापारी करार किंवा कामे करतात. यांत मी बिगर मराठी माणसाला अजिबात दोष देत नाही. तुला न मला घाल कुत्र्याला ह्या म्हणीप्रमाणे मराठी माणूस कंगाल राहिला नि परप्रांतीय हत्ती झाले. धनसम्राट झाले. आम्ही आता त्यांच्याच पोटात घुसायला हवे. मार्केटींगचे दर्जा नियंत्रणाचेचिकाटीचे सातत्याचे धडे गिरवायला हवेत आणि व्यापारी व्हायला मराठी माणसाने सज्ज व्हायला हवे.
            मराठी माणसे संकटकाळीपरीक्षेच्या वेळी अतिशय उत्तम कामगिरी बजावतात. एरवी ते सहजरित्या घेतात. बिगर मराठी माणूस मात्र प्रत्येक दिवस परीक्षेसारखा घेतो म्हणून यशस्वी होतो.
            मराठी माणूस चुकांची कबुली कधीच प्रांजळपणे करीत नाही. त्यावर वाद घालणे वकिली शब्दात चूक असली तरी आपण कसे बरोबर हे दाखविण्यात वेळ दवडतो.
            मराठी माणूस स्वतःसाठी उत्तम वकील असतो. बिगर मराठी माणूस चुकांची कबुली देऊन शक्यतो वाद टाळून पुढे जाण्याचा प्रयत्न करतो.
गैरसमजूत हा मराठी माणसाचा पायाभूत स्वभाव आहे. आपल्या मोईन इतर माणसांबद्दल गैरसमजूत करून घेणे आणि आपला हेका न सोडणे हाही मराठी मनाचा स्वभाव बदलणे आवश्यक आहे.
            महाराष्ट्रात जाती - उपजातीतील भांडणे ही मराठी माणसाच्या आर्थिक विकासाला अडथळा आणणारी मोठी विचारात घेण्यासारखी गोष्ट आहे. मराठा ब्राम्हण मराठी - माळीधनगर - माळीसाळी - माळी - कोष्टीमराठी वंजारीवंजारी - धनगर अशा अनेक जाती - उपजातीतील भांडणांचा अभ्यासपूर्वक विचार केला तर राज्यकर्त्यांनीच आपल्या साईसाठी - मतदारांचा एक गट्ठा करण्यासाठी अशा गोष्टींना प्रोत्साहन दिले व आपल्यात संघर्ष लावून दिले व त्याचा भरपूर फायदा मराठीपरप्रांतीयांनी उचलला हे लक्शात येते. ह्यात त्यांचीही चूक नाही. आपणच उपडी करून दिलीमग ते काय थांबणार.

            वर्षानुवर्षे शेतीव्यवसायातलढायांत अडकल्यामुळे ऐश्वर्य उपभोगण्याची सवयच मराठी माणसाला नव्हतीत्यामुळे जरी समजा श्रमाने व नशिबाने श्रीमंती वाट्याला आली तरी त्यावेळी मराठी माणूस अविचारी बनतो व संपत्तीला वाटा निर्माण करतो. हीही गोष्ट मराठी माणसाला विचारात घ्यावी लागणार आहे.
अपयश हे आपले कर्तुत्व कमी पडल्यामुळे किंवा नसल्यामुळे आले आहे असा सरळ कबुलीजबाब देण्याऐवजी काय करूनशीबच नाही असे सांगून ते स्वतःची व कुटुंबाची फसवणूक करीत असतात.
            १०० उपकार केले आणि १०१ वा उपकार करू शकलो नाहीतर मराठी माणसे एकमेकांत वैर निर्माण करून घेतात व अहंभावापायी पुन्हा एकत्र येत नाहीत.  परप्रांतीय उपकाराची जाणीव ठेवून शक्यतो परतफेडीचाही विचार सतत करतो मराठी माणसे बिगर मराठी माणसाकडे निमूटपणे काम करतात. पण मराठी माणसाकडे भांडून त्याचे नुकसान करतात हाही अनुभव आहे.

            मराठी भागीदारी - कारखानदारी दीर्घकाळ टिकल्या नाहीत. सर्व भागीदारी कंपन्या फार छोट्या अवधीत मोडकळीस येतात. बिगर मराठी माणसे शक्यतो भागीदारी टिकवण्याचाच प्रयत्न करतात. अगदीच अशक्य झाले तर फर्म चालू ठेवून त्याचा फायदा एकाने घ्यायचा व रोकड रक्कम दुसऱ्याने घ्यावयाचीअसा तोडगा काढतात. हेही मराठी माणसाने समजावून घेतले पाहिजे. भागिदारी मोडण्याचीही प्रमुख कारणे आर्थिक बेशिस्तअवास्तव उचलअनाठायी खर्च हेच असतात.
            गेल्या १५ - २० वर्षांत महाराष्ट्रात नागरी सहकारी बँका मराठी माणसांनी फार मोठ्या प्रमाणावर सुरू करून अर्थकारणाचा फार मोठा भार त्यांनी शहरी भागात उचलला आहे. तथापि बारकाईने अभ्यास केला तर यांतील बहसंख्य डायरेक्टर मराठी असले नोकर मराठी असले तरी पैशांचा उपयोग मात्र बहुतांशी बिगर मराठी माणूसच करत असतो. कारण मराठी माणसाने अर्थकारणात विश्वासार्हता टिकवलेली नाही. मुळात मराठी माणसांत आपल्या आपल्यातच आर्थिक विश्वासार्हता नाही. त्यापेक्षा आपण परप्रांतीयांवर पटकन विश्वास टाकतो.
           मराठा चेंबर आणि महाराष्ट्र चेंबरमध्ये बहुसंख्य बिगर मराठी सभासद व पदाधिकारी आहेत. मराठी माणूस आहे तो नोकरदार. याचाही मराठी माणसाने विचार करण्याची गरज आहे नव्हे ती काळाची गरज आहे.
                               :- भास्कराव म्हस्के

No comments:

Post a Comment