फसव्या जाहिरातींवर वचक कसा बसेल. ?
सध्याचे युग हे जाहिरातीचे युग
असल्यामुळे सर्वच प्रसार माध्यमांमधून जाहिरातींचा प्रचंड भडीमार होत असतो.
मँगीबदल झालेला दर्जा नियंत्रणाचा गोधळ हा सर्वश्रुत आहे परंतु तरीही त्यातून आपण
व सरकार कोणताही बाध घेत नाही. उलट जाहिरात करणारे हे अतिप्रतिष्ठित म्हणून
त्यांना सोडून देण्यात येते. बंड अम्बसेंडर म्हणून काम करणान्या व्यक्तींनी केवळ
पैशाच्या प्रलोभनापायी जाहिराती करणे कितपत योग्य आहे , हा प्रश्न कोणीही
विचारत नाही. ज्या पदार्थाची जाहिरात करावयाची आहे , त्याच्या
गुणवत्तेची खातरजमा करण्याची या मंडळींना आवश्यकता का वाटत नाही ?
एकुणच जीवनाच्या
अनेक क्षेत्रांमध्ये जाहिरातींचे प्रचंड पेव फुटले आहे. त्यात खाण्याच्या वस्तू , कपडे - लत्ते , घरांच्या जाहिराती , सोने - नाणे , सिनेमा - नाटके , निरनिराळे
करमणुकीचे कार्यक्रम , चारचाकी व दुचाकी गाड्या , मोबाईल फोन , कॉम्प्युटर , सर्जिकल , इनस्ट्रमेंटस् , खेळ इत्यादी
गोष्टींचा समावेश असतो. तसेच राजकीय सामाजिक पुढाऱ्यांचा वाढदिवस , कटआऊटस रस्त्यांवर
मोठ्या प्रमाणावर प्रसिध्द केले जातात.
वर्तमानपत्रात
अनेक जाहिराती असतात. कोणीही एजंट होतो, बिल्डर होतो व जाहिरातीचा तडाखा
चालू करतो. लोक नीट पहात नाहीत , फसतात. सारांश जाहिरातीचा सत्यांश न
तपासल्यामुळे व खोट्या व फसव्या जाहिराती दिल्यामुळे व फसवी वक्तव्य केल्यामुळे
जनतेची संभ्रमावस्था होते व त्यामुळे अशा खोट्या व्यावसायिकांचे , राजकारण्यांचे
फावते. एवढेच नव्हे तर चुरचुरीत व खमंग बातम्या देण्यासाठी काही वृत्तपत्रे
बातम्या अतिरंजित करून छापतात.
अपूर्ण , ऐकीव माहितीच्या
आधारे अभ्यास न करता टी. व्ही. टॉक चनलवाले दणादण तर्क वितर्क करीत असतात. यामुळे
देशात गोंधळ , अराजक माजण्याची पार्श्वभूमी तयार होते. कारण वृत्तपत्र न वाचता , केवळ माध्यमांवरील
चर्चेनुसार लोक आपापली राजकिय , सामाजिक मतं बनवू लागली आहेत. त्यासाठी
आचारसंहितेचीच गरज नाहे. यात लोकांचीही चूक असली तरी सरकारनंही या गोष्टींसाठी
यंत्रणा उभारली पाहिजे. त्यावर उपाय एकच , की अशा बातम्यांवर व निरनिराळ्या
चर्चासत्रावरील सत्यांश
शोधण्यासाठी कणखर जाहिरात कंट्रोलर हवा. जाहिरात येण्यापूर्वी ती नियंत्रण
ऑफिसात तपासली गेली पाहिजे. खोट्या जाहिरातीमुळे व खोट्या वास्तवामुळे जनतेची फार
मोठी दिशाभूल होते. प्रचंड आर्थिक नुकसान तर होतेच पण शारीरिक नुकसानही होते. खरं
म्हणजे यासाठी जनहित याचिका दाखल करणे आवश्यक आहे व त्यात राजकीय पक्षांनाही सोडता
कामा नये.
-
भास्करराव म्हस्के
No comments:
Post a Comment